भारत देशात एखाद्या व्यक्तीला समोरच्या “व्यक्तीच्या” किंवा “व्यक्तींच्या समूहांच्या” विचारधारा(Ideology) नुसार जगण्यास आवडत नसेल आणि त्याला त्याच्या स्वतंत्र विचारधारा(चांगली) नुसार जगण्यास आवडत असेल तर त्याला “वाईट व्यक्ती” किंवा “बिघडलेला माणूस” अशी उपमा दिली जाते। भारत देशातील घरातल्या परिस्थिती मध्ये पण काही अशीच गोष्ट बघायला मिळते। भारत देशातल्या भरपूर आईबापांना त्यांचा मुलगा असो व मुलगी हे आपले विचारधारेच्या गुलाम(slave) असायला हवे असेच वाटते मग ते विचारधारा कितीही अतार्किक(illogical) आणि तत्यहीन(factless) असेल तरीही। आईबाप करतात तेच खरे, तेच चांगले, तेच सर्वश्रेष्ठ, तेच जगमान्य मग ते कितीही चुकीच्या आणि अंध विचारसरणी बाळगून केले तरीही आणि त्यांचाच मुलगा किंवा मुलगी एखादा कार्य चांगल्या आणि वैज्ञानिक(scientific) विचारधारा ठेवून केली असेल तरीही ते वाईट किंवा असंस्कृतच ह्या भारत देशातील लोकांसाठी। भारत देशातील भरपूर आईबापांना आपला मुलगा किंवा मुलगी जन्माला आले की 'हा' किंवा 'ही' फार मोठी व्यक्ती व्हावे असे वाटते पण जेव्हा आपल्या मुलाला किंवा मुलीला तो यश संपादन करण...